Wednesday, June 4, 2008

Notice - for wrong understanding

कॄपया कोणीही blog पाहताना चुकीचा समज करु नये.
blog वरील कविता माझ्या आहेत असे मी कुठेही mention केले नाही.
blog वरील एकही कविता माझी नाही.
मी फ़क्त मला आवडलेल्या कविता, चारोळ्या post करत असतो.
मला जर कवीचे नाव माहिती असेल तर मी लिहीत असतो.
माझ्या स्वत: च्या कविता मी वेगळा label लावुन post करीन.
तुम्हाला लवकरच माझ्या स्वत: च्या कविता वाचायला मिळतील.


काही तरी नवीन....!

Panavlelya dolyani
manashi khant keli,
"Aswancha bhar amhich ka zelayacha"?

kinchit hasun man mhanale,
"Swapn koni pahili hoti...?"

Kavita

लाख क्षण अपूरे पडतात

आयुष्याला दिशा देण्यासाठी

पण, एक चुक पुश्कळ आहे

ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात

यशाचं शिखर चढण्यासाठी

पण, जरासा गर्व पुरा पडतो

वरुन खाली गडगडण्यासाठी


देवालाही दोष देतो आपण

नवसाला न पावण्यासाठी

कितींदा जिगर दाखवतो आपण

इतरांच्या मदतीला धावण्यासाठी


किती सराव करावा लागतो

विजश्रीवर नाव कोरण्यासाठी

पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो

जिंकता जिंकता हरण्यासाठी



कितीतरी उत्तरं अपुरी पडतात

आयुष्याचं गणित सुटण्यासाठी

कितीतरी अनुभवातनं जावं लागतं

आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी


विश्वासाची ऊब द्यावी लागते

नात्याला जिवनभर तारण्यासाठी

एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे

ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

Monday, June 2, 2008

Charolya

बायकोच्या हाती कधीतरी
प्रेयसीची जुनी पत्र पडतात
घरात मग तासातासाने
रामायणाचे एपिसोड घडतात
=====================
जे लोक महाराष्ट्रात
इंग्रजी बोलतात
तेच लंडनला गेल्यावर
मराठी मंडळ काढतात
=====================
प्रजासत्ताक दिनालाच फक्त
आमच्या देशप्रेमाला वाव आहे
एरव्ही आमच्या झेंड्यालाही
कचरयाचाच भाव आहे
=====================
एका ब्रम्हचारयाला एक
वेगळाच शौक जडला
पोरगी पटवायला जाताना तो
चक्क हनुमानाच्या पाया पडला
======================
स्टॆनोशी मी बोलताना
बाँसने मला पाहिलं
तेव्हाच मी समजलो
माझं प्रमोशन लांबल....

Tuesday, May 13, 2008

Charolya

पुतळे उभारुन
खरचं स्फुर्ती मिळते का?
ते सरावाचे झाल्यावर
नजर तरी वळते का?
======================
प्रत्येकाला एक आभाळं असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटं असावं
संध्याकाळी परतण्यासाठी
======================
इथे वेडं असण्याचे
खुप फ़ायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

Wednesday, April 30, 2008

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु.
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे.
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल........................!
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल................!
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल....................!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा.
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील.
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक.,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..............!
आठवण माझी कधीतरी येईलच तुला